२२ मार्च २००९

'ग्रीष्म'

ऋतुचक्र फसुनी आहे, तल्खीस अंत नाही
ग्रीष्मातल्या तरीही जगण्यात खंत नाही

होती उमेद धरिली लंघीन मेरू पायी
रक्ताळलो परंतु काटयात ठायी ठायी
मी वेचिल्या फुलांना उरला न गंध काही
ग्रीष्मातल्या तरीही जगण्यात खंत नाही

पाऊल तापलेले कुरवाळता मी पाही
मम भार साहवे जी, ती तडकली धराही
मी शोधिला परंतु फुलला वसंत नाही
ग्रीष्मातल्या तरीही जगण्यात खंत नाही

ना वांछिले बगीचे, सुम­पर्ण गालिचेही
वर्षाव अत्तराचा ना इच्छिला कदाही
पण या सदाफुलीला कसला सुगंध नाही
ग्रीष्मातल्या तरीही जगण्यात खंत नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा