आलाप घेववेना, कंठात स्वर वळेना
नग्मा अबोल झाला का हे मला कळेना
बेरंग झालि श्याई, कागद उडून गेला
निस्तेज हुनर पडला अन शब्दही जुळेना
तू कारवां उठविला बेहोश मज बघोनी
गेलीस टाकुनी अन कुणि दोस्तही मिळेना
परिणाम वारुणीचा? वा स्वार्थ मैत्रिणीचा?
की सूड उगवलेला? मज काहिही कळेना
मैफल उठून गेली, घुंगरू तुटून पडले
तरि का अजून प्याला हातातुनी गळेना?
करशील माफ मज तू विसरून जाहले जे
ही आस लावणे मज अजु्नी कसे टळेना?
१६ मे २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा