२७ मे २००९

कोणा एका कवीचे ’रेक्वीयम”

डोळे यावे भरुन कुणाचे अलगद पाण्याने
कोणाच्या हृदयात तुटावे माझ्या जाण्याने

रसिकांपाशी आहे माझी एकच ही प्रार्थना
जाताना मज निरोप द्यावा माझ्या गाण्याने

वाङमयचोरीचा माझ्यावर आळ नका घेऊ
धरा भरवसा, केली कविता स्वतंत्र बाण्याने

प्रयास केला रसिकवरांना तृप्त राखण्याचा
अभंग-गाणे-मुक्तछंद वा गजल-तराण्याने

असाल झाला आल्हादित जर रचनांनी माझ्या
जिणे सार्थ, मी म्हणेन, झाले कलम उचलण्याने

शिळेवरी कोरा "देवा, दे तू याला शांती
हसुआसूंचे आसव दिधले आम्हाला ज्याने"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा